संजय सोनवणी
जगाच्या इतिहासात अनेक धर्म, संस्कृती आणि समुदायांनी वेळोवेळी आपापल्या श्रद्धा आणि भूमिकांनुसार विविध संघर्षांना जन्म दिला आहे. त्यामध्ये ज्यू धर्म व त्याच्या अनुयायांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यातून उद्भवलेले हिंसक व दहशतवादी कृत्य हेही एक गंभीर आणि चर्चेचा विषय ठरलेला आहे. प्रस्तुत लेखामध्ये लेखक संजय सोनवणी यांनी ज्यू धर्माच्या स्थापनेपासून ते आधुनिक इस्रायली राजकारण आणि दहशतवादाच्या घटनांपर्यंतचा एक सविस्तर ऐतिहासिक मागोवा घेतला आहे.
या लेखात लेखकाने ज्यू धर्माच्या धार्मिक ग्रंथांमधून प्रेरित झालेल्या हिंसक आज्ञा, तत्कालीन जमातींवर करण्यात आलेले अत्याचार, आत्मघातकी दहशतवादाचा उदय, आणि २०व्या शतकातील अनेक चर्चित हत्याकांडांचा उल्लेख केला आहे. इस्रायलच्या स्थापनेपूर्वीपासून सुरू झालेला हा संघर्ष आजही संपूर्ण जगासमोर एक मोठा प्रश्नचिन्ह म्हणून उभा आहे.
लेखकाने यामधून हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे की, ज्यू धर्माच्या इतिहासातही अशी अनेक कृत्ये घडली आहेत जी दहशतवादाच्या व्याख्येत बसू शकतात. आज इस्त्रायेल आणि पॅलेस्टाईन यांच्यात चालू असलेला संघर्ष शांत करायचा असेल, तर ऐतिहासिक अन्यायांची जाणीव ठेवून न्याय्य भूमिकेवर आधारित शाश्वत उपाय शोधणे अत्यंत आवश्यक आहे.
हा लेख वाचकांना ज्यू इतिहासातील एका अनभिज्ञ, पण महत्त्वाच्या अंगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देतो आणि धार्मिक आणि राजकीय दहशतवादावर मर्मभेदी प्रकाश टाकतो.
ज्यूंनी केलेला दहशतवाद
- इ.स.पु १२५० (अंदाजित काळ) ज्यू धर्माची स्थापना झाली. जुन्या करारानुसार यहवे हा ज्यूंना इस्त्राईल पवित्र भूमी दान करतो. ज्यूंनी त्यागलेल्या कोनन प्रांतावर त्यांना स्वामित्व हवे होते. जुन्या करारानुसार ज्यू ही आदमची संतती म्हणून घोषित करतो तर अन्य मानवजात हीन दर्जाची आहे असे सांगतो. तत्कालीन भूभागात राहणारे हित्ताईट, कोननाईट, अमोराईट, फिलीस्तीनी इत्यादी जमातींची प्रार्थनास्थळे जाळून टाका अशा स्वरूपाच्या आज्ञा जुन्या करारात येतात. एकेश्वर न मानणा-यांचा समूळ नायनाट हे त्यांचे ध्येय होते.
- एक्झोडसमधील इजिप्तने केलेला ज्यूंचा छळ व सामुहिक निर्गमन ही कथा काल्पनिक आहे हे आता आधुनिक विद्वानांनी सिद्ध केलेले आहे.
- धर्म स्थापनेनंतर सनपूर्व १००० पर्यंत ज्यूंनी कोनान प्रांतातून कोननाइट धर्म व त्यांच्या अनुयायांचा पुरेपूर उच्छेद केला.हजारो ठार मारले.
- राजा डेव्हिडने जेरुसलेमला आपली राजधानी बनवले व त्याच्या मुलाने म्हणजे राजा सोलोमनने पहिले ज्यू मंदिर बांधले. (सनपूर्व ९२०) ज्यूंचा हा सुवर्णकाल मानला जातो. यानंतर असंख्य ज्यू व्यापार-उदेम आणि धर्मप्रचार यासाठी बाबिलोनिया व उर्वरीत अरब जगात पसरले. इजिप्शियन आणि अरब जमाती आपल्या पूर्वापार प्रतीमापुजक धर्माला चिकटून राहिल्याने दोन धर्मात संघर्ष तेंव्हापासूनच आहे.
- यहवेने जुन्या करारात (ड्यूटरोनोमी ७ व २० मध्ये) ज्यूंना दहशतवादी आज्ञा दिलेल्या आहेत. हित्ताईत ते पेरीझाईट या सात राष्ट्रांना नष्ट करावे आणि त्यांच्या धर्मानुयायांना ठार मारावे या स्वरूपाच्या या आज्ञा आहेत.
- यामुळे सनपूर्व ५८७ ते सनपूर्व ६४० पर्यंत इस्त्राईलवर अनेक आक्रमणे झाली. बाबिलोनियाच्या आक्रमणात ज्यूंचे जेरुसलेमचे मंदिर उध्वस्त केले गेले. इस्त्राईल हा कधीही स्वतंत्र प्रांत नव्हता. कधी पर्शियन ते कधी रोमन साम्राज्याच्या अंतर्गतच हा भूभाग होता. त्याला स्वतंत्र अस्तित्व नव्हते.
- सनपूर्व ३३३ मध्ये अलेक्झांडरने हा सर्व प्रांत जिंकला. सनपूर्व ६३मध्ये रोमन सत्ता स्थापन झाली. या काळात ज्यू या प्रांतातून विस्थापित झाले पण अन्य जमाती मात्र तेथेच राहिल्या.
- येशू ख्रिस्त ज्यू होता पण तो धर्मसुधारणा करतो म्हणून त्याला क्रुसावर चढवायला ज्यूंनी भाग पाडले.
- आत्मघातकी दहशतवादाचा आरंभ ज्यूंनी सन ६३ पासून सुरु केला व आपली आत्मघातकी पथके निर्माण केली. Zealot या शब्दाचा तेथूनच उगम झाला. आत्मघातकी दहशतवादाचे उगमस्थान ज्यू धर्मात आहे.
- ज्यूंना बहुतेक सर्वच राष्ट्रे (भारत सोडून) दुय्यम वागणूक दिलेली आहे. एवढेच नव्हे तर सन ५५४ मध्ये फ्रांसने, सन ८५५ मध्ये इटलीने, ज्यूंची समग्र हकालपट्टी केलेली आहे. अशा राष्ट्रांत युक्रेन, लिथुआनिआ, बोहेमिया, रशिया या राष्ट्रांचाही सहभाग आहे. केवळ ज्यू श्रीमंत होते, सावकार होते, कंजूस होते म्हणून असे झाले असे दावे केले जातात.
- युरोपियन लोकांचा सेमेटिक (ज्यूही सेमेटिक वंशाचे आहेत म्हणून) लोकांचा द्वेष करण्याची प्रवृत्ती अठराव्या शतकापासून वाढली. बाप्पा अब्राहम आणि येशू हे सेमेटिक नव्हे तर आर्य वंशाचे होते हे सिद्ध करण्यात युरोपिय्न विद्वानांनी आपल्या लेखण्या झिजवल्या. अब्राहम आणि भारतीय ब्रह्म यात साधर्म्य शोधले गेले.
- इस्त्राइल हा भाग फक्त हिब्रू लोकांचा हे सत्य नाही. तेथे अनेक अन्य जमाती पूर्वापार राहत आलेल्या आहेत. फिलीस्तीनीही त्यातलेच. दोन हजार वर्षापूर्वीच ज्यूंनी ही भूमिही त्यागलेली आहे.
- हिटलरमुळे जर्मनीत तर स्टालिनमुळे रशियात ज्यूवर अनन्वित अत्याचार झाले. लाखो अमानुष पद्धतीने ठार मारण्यात आले. त्यामुळे ज्यूबद्दलची जागतिक सहानुभूती वाढत गेली.
- अद्याप इस्त्राएलची स्थापनाही झालेली नव्हती पण मेकोकेम बेगिन याने आखलेल्या योजनेनुसार २ जुलै १९४६ रोजी जेरुसलेममधील किंग डेव्हिड हे हॉटेल व डेरे यासीन येथे हत्याकांड केले. ९१ लोक किंग डेव्हिडवरील हल्ल्यात तर २६० अरब डेरे यासीन येथील हल्ल्यात ठार झाले. स्त्रिया व मुलेही मृतात होती. इर्गुन व स्टर्न gang या ज्यू दहशतवादी संघटना होत्या. बेगिन इर्गुनचा संस्थापक. आश्चर्य हे की याला पुढे शांतीचे नोबेल मिळाले. ट्रंप लाही मिळेलच बहुदा.
- मे १९४८ मध्ये अरब व ज्यूमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या काउंट फोल्बे बर्नाडोट याची हत्या स्टर्न Gang ने केली.
- इस्त्रएलने सुएझ कालव्यावर मालकी सांगून इजिप्तशी वैर घेतले. याच काळात सिनाई द्वीपकल्प व गाझा पट्टीचा भाग इस्त्राएलने बळकावला.
- १९६० मध्ये झालेल्या सहा दिवसीय युद्धात इस्त्राईलने जेरुसलेमवर ताबा घेत ज्यूंचे पवित्र मंदिरही ताब्यात घेतले.
- २१ फेब्रुवारी १९७३ ला ज्यू कमांडो पथकांनी त्रिपोलीवर हल्ला चढवून तेथील ३५ निर्वासितांना ठेचुन मारले. त्याच दिवशी इस्त्राईली लढाऊ विमानाने लीबियन नागरी विमानाला पाडले. त्यात शंभर प्रवाशांचा मृत्यू झाला.
- फेब्रुवारी १९९४ मध्ये गोल्डस्टीनने घडवलेले हेब्रोन हत्याकांड अत्यंत भयंकर मानले जाते. येथील इब्राहीमी मशिदीत नमाजासाठी जमलेल्या लोकांवर गोळीबार व बॉम्बफेक केली गेली. यात २८ नागरिक ठार झाले तर शेकडो जखमी झाले.
- याच धर्मातून निघालेल्या ख्रिस्ती आणि इस्लामने याच क्रूर आज्ञा पालनात आणल्या किंवा आपल्या धर्मात उसण्या घेतल्या.
ज्यू दहशतवादाच्या या ठळक घटना. स्थापनेपासून ज्यू दहशतवादाची कास धरत आले आहेत आणि तोच सिलसिला आजही चालू आहे. या संदर्भात आज या भागात शांतता नांदायची असेल तर इस्त्रैल आणि फिलीस्तीन यात भूभागाची काटेकोर वाटणी करून कायम स्वरूपी सीमा आखावी लागेल.
संयुक्त राष्ट्रांनी इस्त्राईल स्थापन करताना हा मुद्दा ठेवला होता पण ज्यूंनी तो मान्य केला नाही त्यामुळे हा प्रश्न चिघळत राहिलेला आहे. तत्वाने पाहिले तर दोन हजार वर्षापूर्वी विस्थापित झालेल्या ज्यूंचा इस्त्राईलवर मुळीच अधिकार नाही. या राष्ट्राची स्थापनाच मुळात कृत्रिम आहे हे ज्युन्नाही समजावून घ्यावे लागेल. आज आहे ते वास्तव मान्य करत सीमा आखून घेणे आणि आपापल्या हद्दीत शांततेने जगणे हेच महत्वाचे आहे. त्यासाठी जागतिक नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा.
हेही वाचा:
TheyWon Online Magazine (English)
TheyWon Online Magazine (Hindi)
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
